Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Nagpur

4 मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना महासरकारची 5 लाख रुपयांची मदत जाहीर

Xtreme News India   13-12-2023 13:39:01   115565

4 मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना महासरकारची 

5 लाख रुपयांची मदत जाहीर 

 

नागपूर, १३ डिसेंबर (UNI) -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेत घोषणा केली की, या दुर्घटनेतील चार मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, नाशिक-पुणे महामार्गावर तीन डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी शिर्डीहून आळंदीकडे भाविक येत असताना संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या पालखीला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने चार जण ठार तर आठ जण जखमी झाले.विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा कनिष्ठ सभागृहात उपस्थित केला.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement